गुरुवार, १२ जून, २०२५

विद्रोही साहित्य संमेलन

विद्रोह या शब्दाचा अर्थ सर्वसाधारण सर्वांनाच माहीत आहे. अजून थोडे खोलात गेले तर विद्रोह या शब्दाचा हिंदी अर्थ बगावत, प्रतिरोध, सत्ताके खिलाप तर मराठी मध्ये या शब्दाचा अर्थ बंड, उठाव, उद्रेक असे अनेक शब्द मिळतात. यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात आयोजित करण्यात आले आहे. आणि यंदाचे विद्रोही साहित्य संमेलन सुद्धा साताऱ्यामध्येच भरविले जात आहे अशी बातमी वाचली. हा काही योगायोग आहे असे म्हणता येणार नाही. सर्व सामान्य आम जनतेसाठी खुले असलेले अखिल भारतीय साहित्य संमेलनात सर्वस्तरीय भरगच्च कार्यक्रमाची नांदी असतांना विद्रोही साहित्य संमेलनाची काय गरज पडली असावी बरे ! दोन्ही संमेलनामध्ये काय मूलभूत फरक असेल, अखिल भारतीय साहित्य संमेलन असो किंवा विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे संमेलन असो, या मध्ये जाणून बुजून कोणी कोणाविरुद्ध आखाड्यात दंड थोपटून उभा नाही आहे मग दोन्ही साहित्य संमेलने एकाच शहरात भरविण्याचं प्रावधान काय ! विद्रोही हे नांव का बरे निवडले असावे. विद्रोह म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे वाद, फूट, बंड, उद्रेक, बगावत इत्यादी. साहित्य क्षेत्रात विद्रोह म्हणजे सर्जनशीलतेच्या आस्तिक मनाला झालेल्या वेदनाच असे म्हणता येईल. आणि या वेदनांचे मुळगाव कोणी सांगेल तर बरे होईल. दोन्ही संमेलनाच्या घटकांनी, आयोजकांनी जर एकत्र येऊन विचारविनिमय करून, सखोल चर्चा करून सहमतीने एकाच व्यासपीठावर, एकाच तंबूमध्ये मराठी भाषेचे एकच साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले तर दुधात साखर पडण्यासारखे होईल. साताऱ्यात या वर्षी भरणारे हे १५ वे विद्रोही साहित्य संमेलन आहे. भारतात वेगवेगळ्या राज्यातील सर्व भाषिय लोक, कार्यक्रम, रूढी, रिवाज, सांस्कृतिक कार्यक्रम, आणि सार्वजनिक संमेलने चांगल्या परंपराप्रमाणे, गुण्या गोविंदाने पार पडतात. मग मराठी भाषेच्या साहित्य संमेलनामध्येच विद्रोह का ? एक भाषा आणि एकच मराठी साहित्य संमेलन असावे असे आपल्या भाबड्या मनाला वाटत राहते . पण आपल्याकडे जेष्ठ विचारवंत, कवी, लेखक, समाजसुधारक, पंडित आहेत, त्यांना सुद्धा असले प्रश्न पडत असतील!

शुक्रवार, १६ मे, २०२५

आहे मनोहर तरी....सुंदर माझे गांव

धुळे चाळीसगांव हाय वे आणि चाळीसगांव धुळे रेल्वे चा आवाज झोपेत कानापर्यंत ऐकू जाईल एवढ्या अंतरावर वसलेले माझे गांव धामणगांव तालुका चाळीसगांव. शहरापासून धामणगांवपर्यंत डांबरी पक्की सडक , आता तर शिदवाडी आणि करमुड पर्यंत त्याचा विस्तार झाला आहे. आणि हे पण खरे आहे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे उलटली आहेत. तरी आपलं धामणगांव एसटीच्या नियमित सोईपासून वंचितच आहे. कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी एक बस येते. परंतु सुटी च्या दिवशी आणि उन्हाळ्याच्या सुटीत तसेच पावसाळ्यात ही बस बंद असते. आहे की नाही अफलातून आश्चर्य. येथील मतदार मतदान करून मुकाट्याने हा त्रास प्रामाणिकपणे सहन करत असतो. गांवातील लोकांना पायपीट करत खडकीसीम फाट्यावर जावे आणि यावे लागते. पायपीट करण्यासाठी सरकार पक्के रोड बांधून देते मात्र एसटीची सोय करू शकत नाही हे एक दुसरं मोठं आश्चर्य आहे. मी सुद्धा आता सत्तरी ओलांडली आहे. जेंव्हा चाळीसगाव डेपोमध्ये चौकशी काउंटरला हा प्रश्न विचारला की धामणगांवाला एसटी ची सोय का नाही. तेंव्हा त्याने काय उत्तर दिले माहीत आहे! धामणगांवचे लोक एसटीतून प्रवास करत नाहीत. स्वातंत्र्याच्या अमृत वर्षकालीन देशात अशी उत्तरे आणि कर्तव्य हीन नेतृत्व असलेली पुढारी असतील तर धामणगावातील सामान्य व्यक्तीने कुठे दाद मागावी ! बरं आपल्या गावांत अशा सामान्य जणांना असे प्रश्न देखील पडत नाहीत कारण धामणगावांतून प्रवासासाठी त्यांना वेदना सहन करण्याची सवय पडलेली आहे. आणि हेच खरे जीवन समजून सामान्य लोकांचा दिनक्रम चालला आहे. ट्रॅक्टरच्या मागील पाण्याच्या टँकरचा आसरा घेवून जीव मुठीत घेऊन प्रवास करतांनाचे बोलके चित्र आपले सहज लक्ष वेधून घेईल. आजकाल पालक मंत्री असो किंवा जिल्हास्तरीय पक्षीय पुढारी असो, त्यांच्या कडूनन बऱ्याच लोककल्याणपयोगी उपक्रम राबविले जात असतात, व्हॉट्सॲप च्या माध्यमातून अशा उपक्रमांचा खूप गाजावाजा चालतो. गावोगावी नाक्यावर पुढाऱ्यांचे बरेच बॅनर सुद्धा सहज नजरेस पडतील अशा ठिकाणी कायम स्वरूपाचे लावलेले आढळतात. आपल्या गावासाठी, सर्वसामान्य लोकांसाठी एसटी ची कायम स्वरूपाची सोय असावी असे कोणाला का वाटत नाही. Own vehicle is the best हे जरी खरे असले तरी गावातील सर्वसामान्य स्वतःचे वाहन नाही विकत घेऊ शकत, गावात येणारे सर्वच पाहुणे रावळे स्वतःची किंवा स्पेशियल गाडीची सोय नाही करू शकणार ती मंडळी ? ( उन्मेश दादाना लिहिलेले पत्र 24.01.2019 श्री उन्मेश दादा पाटील सस्नेह नमस्कार सर आपले पत्र मिळाले, आपण तुरंत विस्तृत रिस्पॉन्स दिला, हे कौशल्य आमच्या सारख्या साध्या माणसाला जमणे अशक्यच. पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार. सर आम्ही आपल्याकडे एक उज्वल भविष्याच्या दृष्टिकोनातून अपेक्षेने पाहत आहोत , पन्नास वर्षांपासून धामणगावांत एसटी ची सोय नाही. ट्रान्सपोर्ट च्या अभावी बाहेरगावचे आमचे नातेवाईक आमच्या येथे मुली सुद्धा द्यायला कचरतात. कोणत्याही कार्यक्रमाला यायचे टाळाटाळ करतात. गांवातला शेतकरी, विद्यार्थी, महिला, आप्तेष्ट यांना चाळीसगांवी जाण्यासाठी खूप कष्ट पुरतात आणि वेळ वाया जातो. ट्रान्सपोर्ट अभावी कामं ठप्प होतं. कृपया या गावकऱ्यांच्या मागणीला प्राथमिकता दिली तर आम्ही ऋणी तर राहूच, परंतु आपलं आमच्याशी एक कायम स्वरूपाचं नातं निर्माण होईल. धन्यवाद आनंदराव कौतिक चव्हाण धामणगांव, तालुका चाळीसगांव.) _____ हा सर्व खटाटोप मी एकदा २०१९ मध्ये करून पाहिला होता , त्यांच्याकडून एक उत्तर आले होते परंतु पुढे काही झाले नाही. आताच्या घडीला हा प्रोजेक्ट जर कोणी घेतला तर त्याचे आपण ऋणी राहू. या प्रश्नाला वाच्या फोडून त्यांच्या पर्यंत पोहचवून पाठपुरावा केला पाहिजे. नाहीतर सर्व गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार घातला पाहिजे. ज्या गावांत माझा जन्म झाला, जी माझी जन्मभूमी आहे त्या गावांची एसटी विना अशी उपेक्षा आणि फरफट बघतांना डोळे पाणावतात. आणि अजून किती दिवस! एसटी ची सोय नसली तरी शहराला जोडणारे पक्के डांबरी रोड आहेत हे काय कमी आहे काय! काही असो , "आहे मनोहर तरी....सुंदर माझे गांव"

मंगळवार, २२ एप्रिल, २०२५

नर्मदा परिक्रमा

नर्मदा परिक्रमा शिशिरची पानगळ संपली होती, आणि चैत्र सुरु झाला होता.निसर्गात चैत्र महिन्यात झाडांना नवीन पालवी फुटण्याची आणि ऋतू बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, परंतु आपले मित्र पराग ओवळेकर यांच्या मनात देखील असेच चैत्र पालवी सारखे एक सुंदर विचाराने घर केले होते आणि चैत्र महिन्यात त्यांनी त्याला आकार दिला सुद्धा. तो त्यांचा स्तुत्य विचार म्हणजे नर्मदा परिक्रमा. नर्मदा परिक्रमा म्हणजे आहे तरी काय ते थोडक्यात जाणून घेऊ. नर्मदा मैया मधे सर्व देवांचा वास आहे म्हणून नर्मदा मैयाची परिक्रमा ही सर्व देवांची परिक्रमा आहे. नर्मदा मैयाच्या किनारी बळी राजा पासून तर ब्रम्हदेवापर्यंत असंख्य देव देवता, ऋषी मुनी यांनी तप केलं, आणि म्हणून नर्मदा किनारी असलेला प्रत्येक दगड हा शिवस्वरूप समजला जातो. खरे तर हे सर्व माझ्या समजण्याच्या पलीकडचे. श्रीयुत पराग ओवळेकर चक्क नर्मदा परिक्रमा करून आले आहेत. हे जेंव्हा मला त्यांच्या कडून कळले तेंव्हा आपल्याला कोणीतरी सोनचाफ्याचे फुल आवडीने द्यावे, त्याच्या मुग्ध सुगंधाने आपण उल्हसित व्हावे आणि त्याचा नाजूक पिवळा रंग डोळे भरून पाहत रहावा पाहत रहावा ! कधी कधी माणूस अशा जागेवर पोहचतो की जिथे आजवरचा सारा फोलपणा जाणवू लागतो. कदाचित असाच क्षण पराग ओवळेकरांच्या आयुष्यात समोर उभा राहिला असेल, माता नर्मदेने त्यांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दृष्टांत दिला असेल, त्यांच्या जवळीक मित्रांच्या प्रेरणेने त्यांच्यापर्यंत आदेश पोहचवला असेल. आणि इच्छा प्रबळ झाल्याशिवाय ही परिक्रमा शक्य नाही. एकदा का इच्छा प्रबळ झाली तर तेथे त्याला कोणी ही रोखू शकत नाही. असे मला त्यांच्या बोलण्यावरून जाणवले. आणि त्यांच्या पराग रूपी नर्मदेचे कवडसे मला त्यांनी व्हॉट्सॲप द्वारे पाठवून दिलेत. ते पुढे म्हणतात ही परिक्रमा नर्मदा मातेनेच आमच्या कडून करून घेतली , एवढे सुरक्षेचे कवच तुम्हाला मिळाल्यानंतर खरंच तुम्ही भाग्यवान आहात नर्मदा परिक्रमाची अनुभूती तुम्हाला आयुष्यभर प्रेरणा देत राहतील. त्यांच्या फोनवरील discussion मध्ये त्यांच्या सात्विक वाणीत कुठलाही अभिमानाचा लवलेश नव्हता. श्रीयुत पराग ओवळेकर आणि त्याचा ग्रूप 12 एप्रिल ते 14 एप्रिल 2025 नर्मदा परिक्रमाच्या मार्गावर होते ग्रुप मेंबर डॉक्टर आशुतोष जोशी सर, मिस्टर प्रशांत जोशी, मिसेस मंजिरी जोशी, मिस्टर समीर वैद्य आणि मिस्टर पराग ओवळेकर ते त्यांच्या शब्दात कथन करतात 13 एप्रिल आणि 14 एप्रिल 2025 रोजी चालत नर्मदा परिक्रमा उत्तर वाहिनी करण्याचा एक संस्मरणीय अनुभव होता. नर्मदा परिक्रमेचे अनेक YouTube व्हिडीओ पाहत असताना. ती नर्मदा परिक्रमा मी एका दिवसात २१ किमी चालवून करू शकतो का ! असे मनात होते. कोणी म्हणतात नर्मदा मैया प्रेरणा देत आहे आणि जर नर्मदा मैयांचा तुमच्यावर आशीर्वाद असेल तर तुम्ही २१ किमी चालत नर्मदा परिक्रमा पूर्ण करू शकता. आणि अचानक. एके दिवशी सकाळी माझा मित्र समीर वैद्य मला विचारत होता की तो डॉक्टर आशुतोष जोशी सरांसोबत नर्मदा परिक्रमेला जात आहे आणि त्यांचे भाऊ श्री प्रशांत जोशी त्यांच्या पत्नी सौ मंजरी जोशी सोबत नर्मदा परिक्रमा उत्तर वाहिनीला जात आहेत. मी लगेच म्हणालो हो मी पण येतोय तुमच्या सोबत नर्मदा परिक्रमेला. डॉ आशुतोष जोशी सरांनी मागील २ वर्षात २ वेळा ही परिक्रमा केली होती. त्यामुळे ते आम्हाला परिक्रमा करण्यासाठी मार्गदर्शन करणार होते. त्यामुळे आता आम्ही पाच जणांचा गट चालत नर्मदा परिक्रमेला जाण्याचे निश्चित झाले. आमचा कार्यक्रम 12 एप्रिल 2025 रोजी रात्री 11:50 वाजता एकता एक्सप्रेसने जाण्याचे ठरले. दुसऱ्या दिवशी 13 एप्रिल 2025 एकता नगर स्टेशनवर पोहोचणे, त्या दिवशी सर्व मंदिरांना भेट देणे जे कार्यक्रमाअतंर्गत अंतर्भूत केले नव्हते. सोमवार 14 एप्रिल 2025 रोजी नर्मदा परिक्रमणासाठी प्रयाण करणे.नर्मदा परिक्रमा संपल्यानंतर परतीचा प्रवास एकता एक्स्प्रेसने सकाळी 5.30 वाजता दादर पर्यंत श्री समीरने सर्वांसाठी ऑनलाइन बुकिंग केले होते. श्री जोशी यांनी नर्मदा परिक्रमा उत्तर वाहिनीबद्दल वाचण्यासाठी मला एक पुस्तक दिले, त्याच्यात तपशीलवार माहिती होती. लेखक श्री ओझा यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव नर्मदा परिक्रमा असे आहे. डॉ. आशुतोष जोशी यांनी नर्मदा परिक्रमेसाठी प्रत्येक सभासदाने आपल्या बरोबर घेण्याच्या वस्तूंची तपशीलवार यादी तयार केली. आणि आता आम्ही सर्व सदस्य नर्मदा परिक्रमेला जाण्यासाठी सज्ज झालो. 12 एप्रिल 2025 रोजी प्रवासाचा दिवस आला आणि आम्ही दादर पश्चिम स्टेशनवर ठरलेल्या सकाळी 11:50 वाजता एकता एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढल्यानंतर आम्ही आमच्या सीटवर स्थानापन्न झालोत. आणि दुसऱ्या दिवशी रविवार 13 रोजी सकाळी 7:30 वाजता आम्ही एकता नगर स्टेशनवर पोहोचलो. तिथून पुढे जीपकारने आमचा प्रवास सुरू झाला. आम्ही थेट श्री गरुडेश्वर मंदिरात गेलो जिथे आमची रूम बुकींग त्यांच्या भक्तनिवासात केली होती. आम्ही आंघोळ करून गरुडेश्वर येथील श्री गुरुदेव दत्त मंदिराचे दर्शन घेतले. मग आम्ही गाडीने श्री कुबेर भांडार मंदिराकडे निघालो. रविवारची सुट्टी असल्याने मंदिराबाहेर प्रचंड गर्दी होती. म्हणून आम्ही मंदिराबाहेरून दर्शन घेतले आणि पुढे श्री स्वामी नारायण मंदिराकडे निघालो. हे मंदिराच्या खूप मोठ्या क्षेत्रावर आहे. आम्ही श्री स्वामीनारायणाचे दर्शन घेतले आणि नंतर हॉटेल महाराजा येथे दुपारचे जेवण केले. दुपारचे जेवण करून आम्ही सती अनुसूया मंदिराकडे निघालो, पुढचे मंदिर नरेश्वर मंदिर होते. दर्शन घेतल्यानंतर भालोदला जाण्यासाठी आम्ही छोटी फेरी बोट घेऊन भालोदला पोहोचलो जिथे एक मुखी दत्त मंदिर आहे, तेथे दर्शन घेतले आणि आश्रमात जवळपास ९५ वर्षांचे श्री प्रताप महाराज यांचे आम्ही आशीर्वाद घेतले. त्याआधी आम्ही श्री रंग अवधूत स्वामी महाराज आश्रमाला भेट दिली जिथे आम्ही श्री शंकर महादेव मंदिराचे दर्शन घेतले. मग आम्ही बडी पनोती मंदिर आणि छोटी पनोती मंदिराला भेट देण्यासाठी पुढे गेलोत.भक्तनिवासात परतताना आम्ही दोघांचे दर्शन घेतले. दुसऱ्या दिवशी सोमवार 14 एप्रिल 2025 रोजी सकाळी नर्मदा परिक्रमा उत्तर वाहिनीचा मुख्य दिवस होता. पहाटे 2:00 वाजता आपण सर्वजण उठून आंघोळ करून परिक्रमेचा प्रवास सुरू केला. प्रथम आम्ही टिळकवाडा येथील वासुदेव कुटीर आश्रमाला भेट दिली जिथून पहाटे साडेचार वाजता आपली नर्मदा परिक्रमा सुरू झाली. त्यानंतर आम्ही रामेश्वराला भेट दिली की जेथे श्री समर्थ रामदास महाराजांनी बांधलेले मारुती मंदिर आहे. पुढे सप्त मातृका मंदिर आहे जिथे सात देवी माता मूर्ती आहेत. त्यानंतर श्री शंकर महाराज मंदिर जेथे श्री शंकर महाराज पुतळा आहे. त्यानंतर नर्मदा माता मंदिर आहे जिथे आम्ही नर्मदा मातेचे दर्शन घेतले आणि नर्मदा देवीला ओटी समर्पण केली. पुढे मनी नागेश्वर मंदिर, कपिलेश्वर मंदिर मग आम्ही रेंगण घाट येथे छोटी फेरी बोट घेऊन नर्मदेच्या दक्षिण वाहिनीला गेलो. नर्मदा माता नदीवर स्नान केल्यावर आम्ही रामपुरा आणि रणछोडदास मंदिराकडे निघालो जिथे श्रीकृष्णाची मूर्ती आहे. बहुतेक मंदिरात श्री महादेव पिंडीची मूर्ती आहे. नंतर आम्ही मंगळेश्वर मंदिराला भेट दिली, पुढची भेट रामानंद आश्रम, गोपरेश्वर आश्रम जिथे श्री महादेवाची मूर्ती मर्क्युरी पासून बनवली आहे. त्यानंतर तपोवन आश्रम, मग सीताराम मोठा आश्रम आणि नंतर परत टिळकवाडा वासुदेव कुटीर येथे 12.30 वाजता पोहचलो की जेथून आम्ही नर्मदा परिक्रमा सुरू केली होती. 21 किमी चालण्याचा नर्मदा परिक्रमा आपण 7 तासात पूर्ण करू शकलो कारण आपल्याला नर्मदा माता आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद लाभला आहे. नर्मदा परिक्रमा खरोखर एक अविस्मरणीय अनुभूती होती. रात्री 7:30 वा. सोमवारी आम्ही एकता नगर स्थानकावर एकता एक्सप्रेसमध्ये चढलो आणि मंगळवारी सकाळी 15 एप्रिल 2025 रोजी आम्ही दादर पश्चिम स्थानकावर पोहोचलो आणि त्यानंतर लोकल ट्रेनने आम्ही सकाळी 6:30 वाजता ठाणे स्थानकावर पोहोचलो. केंव्हा तरी एकदा चांदण्यात पुन्हा जाईन मी नर्मदा माईच्या जलाशयात पुन्हा जलमय होईन मी