Wednesday 27 November 2019

शपथविधी सोहळा मुख्यमंत्र्यांचा

महाराष्ट्रात शेवटी पोरखेळ संपला एकदाचा,  पोरखेळ संपलाअसला तरी खरा खेळ आता रंगात येणार आहे. कोणी कोणाच्या मुसक्या आवळल्या, कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला. कोणाच्या नाड्या कोणाच्या हातात आहेत, कोणी कोणाची शपथ घेतली. कोणी माईंड गेम केला, आणि कोण आयजीच्या जीवावर बायजी उदार झाला. कोणी कोणाला मित्रता तोडण्यास भाग पाडले आणि कोणी स्वतःच्या हाताने आपले परतीचे दोर कापून घेतलेत. भरपूर प्रश्न डोक्यात घोंगावत असतील परंतु आता शांत राहणे गरजेचे आहे कारण उद्या तारीख 28 नोव्हेंबर 2019 रोजी शिवसेने तर्फे मुख्यमंत्री शपथ घेत आहेत.  प्रचंड मतभिन्नता असलेले सरकार उदयास येत आहे, की ज्यांनी जिभेच्या तलवारीने एकमेकांवर सपासप वॉर केले होते, ते आता एकत्र एका ताटात जेवणार आहेत. सरोवर किचड रहित हो तो ओ शोभा देता है, हे सुद्धा तितकेच खरे आहे. काहींना वाटतं खेळ संपला, पण राजकारणात खेळ कधीच संपत नाही. एक संपला की दुसरा सुरू होतो. जो पर्यंत खेळ आणि खेळाडू आहेत तो पर्यंत सामना होणारच. जनता मात्र आपला मतदानाचा हक्क बजावीत असते. एकदा दिलेले मत त्याला परत घेता येत नाही आणि मत परत घेण्यासाठी तसा कायदाही अस्तिवात नाही. सुरुवातीलाच महा शिव विकास आघाडीतील शिवसेनेने शिव हा शब्द गमावला. शिवसेनेने काय कमावलं आणि काय गमावलं हे रोज आपणास वर्तमान पेपरात वाचावयास मिळेल आणि येणारा काळ देखील सांगेल, त्यावेळेस सर्व्हे करण्यासाठी मिडियावाल्यांची गरज नसेल.

Saturday 16 November 2019

देशका चौकीदार

राफेल विमान खरेदीत केंद्र सरकारला क्लीन चिट

राफेल विमान खरेदीत भ्रष्टाचाराचा आरोप करणारे राहुल गांधी यांना जनतेने लोकसभा 2019 च्या मतदानद्वारे चांगलीच चपराक दिली आहे. त्यामुळे त्यांना परत माफी मागायला लावणे म्हणजे जनतेपर्यंत आवाज पोहचविणे असा अर्थ होतो.  कारण आपल्या देशात जनता अशी एक न्यायालय आहे की सुप्रिम कोर्टाचा निर्णय यायच्या अगोदरच जनता व्होटींग द्वारे न्याय देवून मोकळी होते. राहुल गांधींचं वक्तव्य "देशका चौकीदार चोर है" असा युंक्तीवाद किती फालतू आणि हीन दर्जाचा होता हे जनतेला मुळीच आवडले नव्हते. विशेष म्हणजे बुद्धीवाद्यांनाही त्यावेळेस बुद्धिभ्रंश झाला होता की काय, त्यांनीही या वक्तव्याविरुद्ध गिलिमिळी चूप केली. शोभेसाठी वापरात येणारे  पतंगाचे रंगीबेरंगी कागद किती तकलादू असतात हे न्यायालया द्वारे पुन्हा एकवेळा सिद्ध झाले. लोकशाहीचा धागा उलगडून बघितला तर सत्ताधाऱ्यांच्या चुका दाखविणे हे विरोधी पक्षाचे धोरण असुच शकत नाही, पण पण सर्वच विरोधी पक्ष हे सारासार विसरून सरकारच्या चांगल्या गोष्टींना विरोध करण्यातच धन्यता मानत असतो. लोकशाहीची अशी जहरी विषवल्ली जनता छाटून टाकते.

तुकाराम गाथा .....

 मुखें सांगे भ्रमकथान । जन लोकाची कापितो मान॥1॥
 असत्य सांगतो जनासी । नाहीं अनुभव आपणासी ॥ध्रु.॥
 कथा करितो ज्ञानाची । अंतरीं आशा बहु लोभाची ॥2॥
 तुका ह्मणे तो चि वेडा। त्याचें बहू उद्देश हाणावा ॥3॥

अमर्याद अशी गणितातली संख्या ज्यांनी वाचली नसेल, त्यांनी घोटाळ्यांची फिगर इन रुपीज वाचून बघावी. असे हे महा प्रचंड  घोटाळ्यांना सुद्धा क्लीन चिट मिळविण्यासाठी का कोणी प्रयत्न केले नाहीत, जनता मात्र अजून विसरलेली नाही. शतके नी शतके निघून जातील परंतु याची उत्तरे मिळणार नाहीत


Thursday 14 November 2019

खुर्ची मुख्यमंत्र्यांची

पावसाळे काय बेडूक पण पाहतात, पण पिके मात्र शेतकरीच घेतो

साक्षर होण्यासाठी अगोदर शाळेत मुलाला घालावं लागतं, असं अशिक्षित आईवडिलांना सुद्धा सांगावं लागत नाही. त्याप्रमाणे मुख्यमंत्री होण्यासाठी त्याची पूर्व तयारी म्हणून आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रीपद मिळणे ही भाग्याची गोष्ट होती, ती त्यांच्यासाठी शिकण्याची एक सुवर्ण संधी होती, एक चांगली opportunity चालून आली होती. डायरेक्ट मुख्यमंत्री होणं त्या कोवळ्या जीवाला पेलवलं नसतं. थोडक्यात दुसरा अखिलेश यादव महाराष्ट्राला झेलावा लागला असता.  परंतु शिवसेनेच्या आडमुठ्या वागणुकीमुळे ही संधी त्यांना घेता आली नाही. सात दशका पासून राज्य करत असलेल्या काँग्रेस घराण्यातील राहुल गांधींना सुद्धा अशी संधी अजून मिळाली नाही. परंतु समज आणि मुख्यमंत्रीपदाच्या हट्टापायी त्यांना आलेल्या संधीचे सोने नाही करता आले. वि.स. खांडेकर मिश्किलपणे म्हणतात, पावसाळे काय बेडूक पण पाहतात, पण पिके मात्र शेतकरीच घेतो. अशी सुवर्ण संधी त्यांना भविष्यात मिळेल की नाही हे येणारा काळचं सांगेल.