Tuesday 4 July 2017

सुंदर लेणं

असं कधीतरी वाचलेलं आठवतं, गाईंच्या खुरातून उधळलेल्या धुळीनं त्याचं सर्वांग धूसर झालं त्यामुळे त्याला पांडुरंग नांव लाभलं. हे नांव महाराष्ट्रात मराठी संस्कृतीत घराघरात आणि चराचरात मिसळून गेलं. कधी हे नांव कीर्तनातून, कधी अभंगातून कधी चित्र शिल्पातून तर कधी लोककथेतून आवर्त होतांना दिसतं. संत नामदेव महाराज आपल्या अभंगात सांगतात, जेव्हा नव्हते चराचर,  तेव्हा होते पंढरपूर. असाच एकदा शिल्पकाराला पडला होता प्रश्न. जसा ज्याला भासला तसा तो विठ्ठल

ओबड धोबड पाषाणात

सुंदर लेणं लपलेलं

वाट बघतं

प्रतिभावंत कलाकाराचं

छिनी हातोडयला पडला प्रश्न

काना मात्रा उकार वेलांटीचं

रूप सोवळं साकारलं

अठ्ठावीस युगेच्या विठ्ठलाचं 

No comments:

Post a Comment