Thursday 14 November 2019

खुर्ची मुख्यमंत्र्यांची

पावसाळे काय बेडूक पण पाहतात, पण पिके मात्र शेतकरीच घेतो

साक्षर होण्यासाठी अगोदर शाळेत मुलाला घालावं लागतं, असं अशिक्षित आईवडिलांना सुद्धा सांगावं लागत नाही. त्याप्रमाणे मुख्यमंत्री होण्यासाठी त्याची पूर्व तयारी म्हणून आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रीपद मिळणे ही भाग्याची गोष्ट होती, ती त्यांच्यासाठी शिकण्याची एक सुवर्ण संधी होती, एक चांगली opportunity चालून आली होती. डायरेक्ट मुख्यमंत्री होणं त्या कोवळ्या जीवाला पेलवलं नसतं. थोडक्यात दुसरा अखिलेश यादव महाराष्ट्राला झेलावा लागला असता.  परंतु शिवसेनेच्या आडमुठ्या वागणुकीमुळे ही संधी त्यांना घेता आली नाही. सात दशका पासून राज्य करत असलेल्या काँग्रेस घराण्यातील राहुल गांधींना सुद्धा अशी संधी अजून मिळाली नाही. परंतु समज आणि मुख्यमंत्रीपदाच्या हट्टापायी त्यांना आलेल्या संधीचे सोने नाही करता आले. वि.स. खांडेकर मिश्किलपणे म्हणतात, पावसाळे काय बेडूक पण पाहतात, पण पिके मात्र शेतकरीच घेतो. अशी सुवर्ण संधी त्यांना भविष्यात मिळेल की नाही हे येणारा काळचं सांगेल.

No comments:

Post a Comment