Wednesday 24 October 2018

बिना कपाशींनं उले त्याले बोन्ड म्हनू नये




*******************************



*******************************



*******************************


*********************



*******************************


________________________________________________________________




________________________________________________________________


________________________________________________________________


________________________________________________________________


________________________________________________________________


________________________________________________________________


________________________________________________________________

वडाचे पान पिंपळाला

● मतदारांचा मोदींवरील विश्वास ढळला...श्री मनमोहन सिंग

-- साहेबांनी असा कोणता सर्वे केला की काँग्रेसवर जनतेचा भरोसा
 दिसायला लागला.
________________________________________________________________

● दिल्लीतील सीबीआय च्या मुख्यालयासमोर काँग्रेस पक्षाने राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली जंगी मोर्चा काढून पंतप्रधानांच्या विरोधात चौकीदार चोर है च्या घोषणा दिल्यात.

-- सीबीआय संस्थेतील दोन सर्वोच्च अधिकारी एकमेकांवर आरोप करत असतांना ते एकमेकांची चौकशी करू शकत नाही. म्हणून केंद्रीय दक्षता आयोगाच्या शिफारशीनुसार दोघांवर कारवाई करण्यात आली. दोघांच्या चौकशीत निपक्षपातीपणा असला पाहिजे म्हणून दोघांना तूर्त पदावरून हटवले गेले. सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यात चौकशी पूर्ण करण्याची मुदत देऊन चौकशी वर देखरेख करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक करून चौकशी अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला आहे. असे असतांना राहुल गांधी आपलं लंघडं घोडं एकाच दिशेने दामटवून पंतप्रधानांवर रोज रोज खालच्या पातळीची भाषा वापरून आपल्या पैलू चे दर्शन देत आहेत. 

@ अशा प्रकारे राजकारणात अतिशय घातक पायंडा पडत चालला आहे. याच्यावर वेळीच आवर नाही घातला तर पुढचं भविष्य वर्तविणे अवघड होऊन बसेल.
**************************************************************

**************************************************************
लोकशाहीचा  धागा  उलगडून  बघितला  तर  सत्ताधाऱ्यांच्या चुका दाखविणे   हे  विरोधी   पक्षाचे   धोरण   असुच   शकत   नाही,   पण   आजकाल  राजकारणात  कोणी   कोणावर   कसेही    मोकाट   आरोप   करत  सुटला  आहे.  लेखक   वि.स. खांडेकर असेच  एका पुस्तकात मिश्कीलपणे  सहज   लिहितात. "गवताची  गंजी  पेटवायला  वाजत गाजत  मशाली  आणाव्या  लागत  नाहीत,  निष्काळजीपणाने  विडी   ओढणारा  मूर्ख   मनुष्य   एका   ठिणगीने   ते   काम  करू   शकतो"  तशा पद्धतीने    आपली   राजकारणी   मंडळी   बिनबोभाट   आरोप  प्रत्यारोप   करत  सुटली  आहे.  कोणाला रॅफेल  मध्ये घोटाळा वाटतो तर  कोणाला भूजल  पातळी खाली गेली  म्हणून त्याच्यात  महा घोटाळा वाटतो. आणि हे  विषय घेऊन कोणी कसेही   वक्तव्य  करतो  आहे.  व्यक्ती   स्वातंत्र्य  म्हणजे  काय  रस्त्याने  आडवा  बांबू  घेऊन  पळत  सुटणे असा  अर्थ  होत  नाही. याच्यावर  काही   बंधने नियम, आहेत  की नाहीत. नसतील  तर  ते करायला हवेत.

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

२०१९ मध्ये पंतप्रधान मोदींची खुर्ची जाणार – शरद पवार (लोकसत्ता फेसबुक)

-- साहेबानी २०१४ मध्ये असेच भाकीत केले होते की मोदी पंतप्रधान होऊच शकत नाही. परंतु झाले उलटेच तेंव्हापासून आजतागायत मोदी पंतप्रधान आहेत.
_________________________________________________________________

जलयुक्त शिवार योजना हा राज्यातील मोठा घोटाळा आहे - महाराष्ट्र
काँग्रेस प्रदेश अध्यक्ष श्री अशोक चव्हाण (लोकसत्ता २४.१०.२०१८)

-- अशोक चव्हाण सर्व ज्ञात आहेत, दुसऱ्याचं बघावं वाकून अन स्वतःचं बघावं झाकून
______________________________________________________________
                       
राज्य सरकारने जाहीर केलेली दुष्काळ सदृश्यची घोषणा फसवी आणि
शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसनारी - विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे
(लोकसत्ता २४.१०.२०१८)

-- मुख्यमंत्र्यांना घोषणा करायला जेमतेम एक दिवस झाला नसेल तेवढ्यात या
महाशयांना साक्षात्कार झालाच कसा, की घोषणा फसवी आणि शेतकऱ्यांच्या
तोंडाला पाने पुसणारी आहे.

No comments:

Post a Comment